Posts Carousel

महाराष्ट्र

नोकरी मिळवून देतो अशा खोट्या आश्वासनाने मोठी फसवणूक

धुळे :सन 2013-पासुन निमसरकारी कार्यालये यातील महाराष्ट्र शासनाने नोकर भरती बंद करून ठेवली आहे.त्यातुन शासकीय नोकरी चे देखील पदभरती कुठे…

महाराष्ट्र

पुणे येथील सेंट जॉसफ बँथनी काँन्व्हेट स्कूल ची विद्यार्थिनी क्षितीजा चे शासकीय रेखा ग्रेड परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत यश संपादन

पुणे… पुणे येथील सेंट जाॅसफ बॅंथनी कॉन्व्हेंट स्कूल देहूरोड, पुणे ही एक शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित शाळा आहे. या शाळेत विविध…

महाराष्ट्र

माता भगिनींसाठी मकर संक्रांतीच्या निमित्त मातृ स्नेह मेळावा संपन्न

साक्री....दिनांक 23 1 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पिंजारझाडी या महाविद्यालयात माता-भगिनींसाठी मकर संक्रांतीच्या पावन परवा निमित्त…

महाराष्ट्र

इव्हिएम हटवा लोकशाही वाचवा चे निवेदन सर्वपक्षीयांनी धुळे जिल्हा अधिकारींना अखेर दिले

धुळे -नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे तर सामान्य मतदाराला सुध्दा अचंबित करणारे आहेत.ज्या प्रमाणे सत्ताधारी भाजप…

महाराष्ट्र

शेवाळी येथे गल्लीत फेवर ब्लॉग बसवण्याचे काम ग्रामपंचायत कडुन सुरू सरपंच नितीन साळुंके यांचे नागरीकांकडुन कौतुक. धुळे……सा पोलीस व्हिजन धुळे प्रतिनिधी…. शेवाळी हे गाव नागपूर सुरत महामार्ग वर बसलेले गाव असून साक्री तालुक्यातील हे गाव विविध अष्टपैलू नेतृत्वाने नावाजलेले आहे. या गावात शासकीय अधिकारी, शिक्षक, वकील, इंजिनियर ,डॉक्टर, पत्रकार,सदन आधुनिक शेती करणारे शेतकरी, ड्रायव्हर गाडी मालक, इंजिनियर राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांचे गांव म्हणून ओळखले जाते. तिथे पूर्वी मातीची घरे असलेले छोटेसे टुमदार गाव होते ते आता शहरीकरणाच्या सुसंस्कृतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. सिमेंट काँक्रीट ची घरे बंगले या गावात आता दिसू लागली आहेत. ग्रामपंचायत या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. संपूर्ण गावामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक गल्लीमध्ये फेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्या जात आहेत. वॉटर सप्लाय च्या नियोजनातून आता एक दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये रस्त्यांची समस्या होती. ती जागृत व पारदर्शकपणे सर्वांची कामे करणारे राजकीय व्यक्तिमत्व दादासाहेब नितीन साळुंके सरपंच यांनी मनावर धरून स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून वार्ड क्रमांक चार मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे वर फेवर ब्लॉक बसवून सुंदर रस्ते बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम करून दिले आहे. यासाठी साप्ताहिक पोलीस व्हिजन ने देखील दखल घेतली आहे. या गल्लीमध्ये नेहमी पाणी वाहत असताना दिसत होते त्यातून अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होत होता. ही समस्या दादासाहेब नितीन साळुंखे यांच्या कानावर टाकल्यावर त्यांनी तात्काळ या गल्लीत फेवर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण देखील केले आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये विद्युत रोषणाई देखील चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने करून दिली आहे. चांगले कार्य करणाऱ्या राजकीय नेत्याचे कुणीही नाव काढते. दादासाहेब नितीन साळुंखे यांचे जाहीर आभार देखील वार्ड क्रमांक चार च्या नागरिकांनी मानले आहेत. फेवर ब्लॉक बसवण्याचे काम गुमन आनंदा गावित मिस्तरी यांनी केले आहे. या कामाची पाहणी सरपंच नितीन साळुंखे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली असता काम समाधानकारक झाल्याचे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य बॉडी व समस्त ग्रामस्थ यांचे यासाठी मोठे योगदान लागले आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, यांचे जाहीर आभार* बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे बीट अंतर्गत केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.नंदुरबार…..सा पोलीस व्हिजन न्यूज…. नंदुरबार जिल्हा मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून चांगल्या दर्जाचे शिक्षण संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमधून व शासनमान्य खाजगी माध्यमिक शाळांमधून चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले जाते विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम या जिल्ह्यांमध्ये राबवले जातात. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. असाच एक शासकीय उपक्रम दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी ,नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदरदे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळोद केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा , खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्लास केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला . सदर कार्यक्रम आदिवासी भागात असल्याने प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर पारंपारिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे (माध्य.) होते.तर उद्घाटक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदनाताई वळवी (प्राथमिक) या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा यशवंत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी योजनाचे, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जि .प .सदस्य श्रीमती राजश्री गावित, नंदुरबार प. स.च्या उपसभापती रंजनाताई पवार, मा. जि. प .सदस्य विश्वनाथ वळवी, शेजव्याचे उपसरपंच मुन्ना वसावे,सिलवंत वाकोडे शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर, डॉ. सचिन गोसावी सुंदरदे बीट विस्तार अधिकारी.माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील,पिपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ, सुंदरदे केंद्राचे केंद्रप्रमुख लीलाधर देसले , परीक्षक म्हणून अमृत पाटील, प्रा.डाॅ. गिरीश पवार, प्रा. अरुप कुमार गोस्वामी,प्रा. प्रशांत देसले, प्रा. दीपक मगरे , पिंपळोद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख यादी उपस्थित होते.अधिकारी व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आदिवासी संस्कृतीनुसार ढोल वाद्यवाजवून शिबली नाचवून व शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी साडीचा पेहराव करून पुष्पांचा वर्षाव करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजापूर जि .प .शाळेच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन नृत्यातून सादर केले तर माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदरदे बीटचे विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रविण अहिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून उल्लास नवभारत साक्षरता अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे व सुंदरदे बीट चे तोंड भरून कौतुक करताना प्रविण अहिरे साहेब म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात उल्हास नवभारत साक्षरतेचा हा मेळावा अप्रतिम व पहिलाच असावा असा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातुन केला.प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनीही आपला मनोगतातून माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत होणाऱ्या नवभारत साक्षरता मेळाव्या मांडण्यात आलेल्या साहित्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील , राजश्री गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साक्षर विद्यार्थी व असाक्षर विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जि. प. मराठी शाळा उमर्दे बु || येथील विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य सादर केले तर, माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार लिखित व दिग्दर्शित साक्षरतेवर आधारित आपण पण साक्षर होऊ या यावर आधारित धमाल विनोदी नाटिका सादर करण्यात आली सदरील नाटकेमध्ये माध्यमिक शाळेचे उपशिक्षक विजय पवार, दीपक वळवी ,आनंदराव पवार, हरुण खा शिखलीगर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन धम्माल विनोदी नाटिका सादर केली. त्यानंतर शैक्षणिक साहित्य मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपशिक्षिका संगीता गोखले व लिपिक नेहा शर्मा यांनी साक्षरतेवर आधारित काढलेली रांगोळी सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले होते. तसेच सदरील मेळाव्यात उल्हास नवभारत साक्षरता वर आधारित शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य, विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती. या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे 18 , पिंपळोद केंद्राचे 17 असे एकूण 35 शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आली होती . आलेल्या अधिकारी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले सदरील मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्य मधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदरदे, व्दितीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बु||, तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा, हरिचंद्र वसावे जि.प. मराठी शाळा तगाईपाडा, यांना देण्यात आला तर. उल्लास नवभारत साक्षरता गणित साहित्य मध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील, सुवर्णा भामरे जि.प. मराठी शाळा लोय, द्वितीय क्रमांक कपिला पतिंगे जि.प. मराठी शाळा शेजवे,तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाठ माध्यमिक विद्यालय उमरदे बु||, रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आला तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बाविस्कर जि प मराठी शाळा राजापूर, द्वितीय क्रमांक कविता बोरसे जि प मराठी शाळा रतनपाडा , तृतीय क्रमांक रवींद्र पाटील ,अरुणा साळवे जि प मराठी शाळा डाकणपाडा यांना देण्यात आला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार, विजय पवार यांनी केले तर आभार पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी मानले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेची उपशिक्षक विजय पवार दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिकलीगर, संजय बोरसे, आनंदराव पवार,संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, समीर वसावे,दिनेश पवार यादीने परिश्रम घेतले . सदरील उल्लस नव साक्षरता मेळाव्याला शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदरदे बीट अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील उल्लास नवसाक्षरता साठी नेमून दिलेले स्वयंसेवक , परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र

नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश मुंबई (क्राईम न्यूज ब्युरो….यश साळुंके) : नंदुरबार…

महाराष्ट्र

अभय माध्यमिक विद्यालय सुंदरदे, येथे भारतीय भाषा उत्सव साजरा. सुंदरदे..(नंदुरबार)…. प्रतिनिधी….. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित, माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील शाळेत शालेय विद्यार्थ्यांना भारतीय भाषा उत्सव साजरे करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब पी जी शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषांतील ओळख व आपल्या संपूर्ण देशामध्ये विविध भाषांचा परिचय असणे सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक आहे.असे आपल्या मनोगतात सांगितले. बहुभाषिकतेला व भारतीय भाषेतून शिक्षण देणे हे प्रामुख्याने शिक्षण प्रवाहाचे मुख्य कारण आज होऊ शकते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे आपली संस्कृतीची ओळख होणे यासाठी भारतीय भाषा उत्सव फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील स्थानिक भाषा, तसेच इतर भाषांमध्ये मराठी गुजराती, इंग्रजी, पंजाबी, मल्याळम, कन्नडी, यांची प्राथमिक ओळख त्यांना असणे गरजेचे आहे. राष्ट्रभाषा हिंदी हिचा जास्तीत जास्त वापर संपूर्ण आपल्या देशामध्ये होतो. ज्या ठिकाणी इतर भाषा आपल्याला बोलता येत नाही समजत नाही त्या ठिकाणी आपण हिंदी आणि इंग्रजीचा वापर करू शकतो. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध भाषांमध्ये गीत गायन तसेच विविध भाषांमधील पुस्तके वाचन करण्याचा उपक्रम राबवला. यावेळी विद्यार्थ्यांना बहुभाषिक ते बद्दल सुंदरदे केंद्र चे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांच्या मार्गदर्शनाखाली बहुभाषिक उपक्रम राबवला.विद्यालयातील उपशिक्षक,श्री.पुरुषोत्तम मराठे सर,श्री.पी.जी.साळुंके सर,श्री.एम.एस.पाटील सर,श्री.नंदकिशोर पोटे सर यांनी मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन श्रीमती वसावे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र

वर्षी येथे अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी व गुरुजन वर्ग यांचा स्नेह मेळावा संपन्न धुळे…. क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित, अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय, वर्षी. तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. येथील शाळेत दिनांक..06-11-2024 वार बुधवार रोजी सन 2005 मध्ये शिक्षण घेत यशस्वी झालेले इयत्ता दहावी चे माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेबद्दल व तत्कालीन आपल्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा एकत्र स्नेह मेळावा घेण्याचे भव्य असे नियोजन केले होते. यावेळी विद्यालयाच्या परिसरात मंडप टाकून कार्यक्रमाचे बैठकीवस्था सुंदर करण्यात आली होती. यावेळी विविध जिल्ह्यातून नोकरी निमित्त काम करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या गुरुजनांच्या प्रति स्नेह भाव दाखवण्यासाठी एकत्रित वर्षी या पवित्र भूमीमध्ये दाखल झाले होती. आपल्या शाळेच्या प्रांगणात आपण इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेत असतानाचे अनुभव, आठवणी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर पुनश्च उमळतांना दिसत होते. पूर्वीचे बालपणाचे मित्र आता वयाने, शरीराने, बुद्धीने, वैचारिक पातळीने खूप मोठे झालेले होते. अशातच 19 वर्षाचा कालखंडानंतर पुनश्च मनोमिलन होण्यासाठी या सर्व मित्रांनी एकत्र येण्यासाठी संघटन बांधण्याचे काम सुरू केले होते. सर्वांचे विचार एकत्र जुडल्यानंतर हा स्नेह मेळावा आपल्या शिक्षण घेतलेल्या शाळेच्या प्रांगणातच घेण्याचे अखेर ठरले. यावेळी जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली होती. सुरुवातीला अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय, वर्षी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या संस्थेचे अध्यक्ष कै. डॉ. अण्णासाहेब सुधाकररावजी बोरसे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांना विनम्र अभिवादन करून,तसेच सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास सूर्यवंशी हे होते. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्रीमान अशोक बोरसे सर, श्रीमान जे.यु.कंरंकाळ सर, श्रीमान सूर्यकांत बोरसे सर, श्रीमान ढोले सर, श्रीमान आर जे बडगुजर सर, श्रीमान प्रल्हाद साळुंखे सर, श्रीमान एम ए पाटील सर, श्रीमती खैरनार मॅडम, श्री पाटील सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री.रमेश माळी, चंद्रकांत बडगुजर,श्री ईश्वर पाटील व काही पालक व विद्यार्थीदिनेश गुरव, पुणेमहेंद्र माळी,धुळेरोहित बडगुजर, अमळनेरहर्षल वानखेडे, अमळनेरसागर थोरात ,पुणेदिपक कोळी,सुरतविरेंद्र बडगुजर,वर्षीगणेश चव्हाण,ठाणेपांडुरंग तावडे,भुसावळपंकज गिरासे,मुंबईस्वप्नील बोरसे,पुणेमोहित पाठक, इटलीनिलेश महाले, वर्षीरामचंद्र माळी,नाशिकविलास माळी,वर्षीअंकुश माळी,नाशिकविजय बोरसे, दत्तानेपुरुषोत्तम पाटीलमुक्तार पिंजारी,पुणेअमर बच्चाव, तावखेडाविशाल सुर्यवंशीराहुल बोरसे,दत्तानेघनश्याम माळीयोगेश बोरसे, दत्तानेवंदना बोरसे,धडगावआशा बडगुजर, शिंदखेडागायत्री पाटील, व्यारादिपाली राऊळ,नगरदेवळासंजीवनी ढोले,पालघरज्योती ठाकुर,कविता चौधरी, खेतियामोनाली ढोले,पुणेपुनम बडगुजर,यावल, विजय वाल्हे, व इतर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुष्प उधळून आपल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रथम स्वागत त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमध्ये शाळेचे संस्कार शाळेने दिलेले आम्हाला उत्तम शिक्षण शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धती शिक्षकांनी दिलेली शिदोरी यातून आमचे भविष्य घडले अशा पद्धतीने आपापली मनोगते व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या शिक्षकांना आपला प्रत्यक्ष परिचय व आता आपण नेमका कोणता व्यवसाय उद्योग करत आहोत त्याची संपूर्ण माहिती देली. बालपणाच्या कोड आठवणी यांचा उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माजी विद्यार्थी दिनेश गुरव याने केले. दिनेश गुरव याने आपली ग्राम भाषा अहिराणी तसेच अधून मधून मराठी मध्ये सूत्रसंचालन करून सर्वांची मने जिंकली. माजी विद्यार्थी पांडुरंग तावडे याने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम व आपले सर्व मित्र एकत्र करण्याचे मोठे काम केले. आर्मी मधून सेवानिवृत्त झालेले माजी विद्यार्थी अंकुश माळी याचा यावेळी उपशिक्षक तथा सा पोलीस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आज अंकुश देशाच्या सीमेवर भारतीयांची रक्षा करत होता. त्याचा सार्थ अभिमान आहे. तसेच पोलीस क्राईम ब्रँच मुंबई येथे माजी विद्यार्थी गणेश चव्हाण याने आपण कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पोलीस भरतीमध्ये कसे भरती झालो आपल्या विचारात त्याने ते व्यक्त केले.माजी विद्यार्थी विजय वाल्हे येणे आपल्या मनोगतात प्रत्येक शिक्षकांनी काय शिक्षण दिले याबद्दल सविस्तर आपल्या मनोगतात विवेचन केले. माजी विद्यार्थिनींमध्ये श्रीमती पूनम बडगुजर ज्या आज यावल येथे ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापिका आहेत त्यांनी आपले विद्यालयाबद्दल जे अनुभव होते ते कथेत केले. त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक श्रीमान प्रल्हाद साळुंखे यांनी वर्षीही पवित्र कर्मभूमी असून येथे बारा बलुतेदार पद्धतीने सर्व समाज एकत्र गुण्यागोविंदाने राहतो. हे अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अण्णासाहेब सुधाकररावजी बोरसे यांचे जन्मभूमीचे गाव असल्याने त्यांनी आपल्या ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातच आपल्याच गावात शिक्षण घेता यावी यासाठी संस्थेची ही शाखा या ठिकाणी सुरू केली. त्यांचे हे मोठे ऋण आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. वर्षी येथील मुलं अतिशय शिस्तप्रिय होते तुम्ही चांगले शिक्षण घेतले त्यामुळे तुम्ही आज यशस्वी झाला आहात आज आमची आठवण पुन्हा तुम्ही केली तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांप्रती भाव व्यक्त केला. त्यानंतर उपशिक्षक श्रीमान एम ए पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांप्रती असलेले सर्व अनुभव कथित केले त्यांना एक सुंदर कथा सांगून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मागील सर्व आठवणींना उजाळा त्यांनी पुनश्च करून दिला. त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान अशोक बोरसे सर यांनी आपल्या ग्रामीण भागातून कष्टकऱ्यांची मुले या शाळेत शिकून आज खूप मोठी झाली आम्हाला खूप मोठा आनंद झाला आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला हे सोपे नाही आजवर ग्रामीण भागातील मुले संस्कारक्षम जपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आनंद आहे त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. अखेर विद्यालयाला सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून मोठे घड्याळ सप्रेम भेट देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी जेवणाचा कार्यक्रम पार पडला.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे… मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके

महाराष्ट्र

सीआरपीएफ जवान शेखर गवई यांचा अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.

धुळे…..सीआरपीएफ जवान शेखर गवई यांच्या कार्याचा लेखाजोखा…….सा.पोलीस व्हिजन, धुळे … जिल्हा अकोला तालुका बाळापूर येथील रहिवासी तथा सीआरपीएफ जवान शेखर…

महाराष्ट्र

भारताच्या क्षितीजावरचा ध्रुवतारा निखळला!महान उद्योजक रतन टाटा अनंतात विलीन. धुळे……..सा.पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो) भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले!

टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले जमशेदपूर…

महाराष्ट्र

पुणे गँगरेप : पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. पुणे…. (सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न पुणेकरांना व सामान्य जनतेला पडला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे राज्य म्हटले जाते. या राज्यात पूर्वी महिला खूप सुरक्षित होत्या. महिलांचा आदर केला जात होता. मात्र वारंवार घडत असलेल्या पुणे शहरातील बलात्काराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करण्याची गरज आहे.पुण्यात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने सरकार आणि प्रशासन हादरले आहे. तास उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली असून, हे संशयित कुठेही दिसल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 14 पथके तयार केली आहेत.21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर हादरलेल्या पुणे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी डझनहून अधिक पथके तयार केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता मित्रासोबत डोंगरमाथ्यावर गेली होती. तेवढ्यात ३ जण तिथे आले. आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. यानंतर दोघांनाही डोंगरमाथ्यावरून खाली उतरवून डोंगराच्या खालच्या भागात नेण्यात आले. त्याला टेकडीवरून खाली उतरवल्यानंतर आरोपीने मुलाला त्याच्याच शर्टने आणि बेल्टने बांधले. हातपाय बांधण्यासोबतच त्याला आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापडही बांधले होते.

पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलाला नियंत्रित केल्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. टेकडीवर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पीडितेला कोणाचीही तातडीने मदत घेता…

महाराष्ट्र

रस्ता वहिवाट वरून दोन शेतकऱ्यांच्या भानगडी अखेर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कायमचे मिटले वाद. अंतापुर, ता. २५: सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…अमरावतीपाडा (ता. बागलाण) येथील दोन शेतकऱ्यांचा वहिवाटी बाबत अनेक दिवसांपासून वाद होत होता व वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर वाद सामोपचाराने मिटविल्याने वादावर पडदा पडला आहे.सदर शेतकऱ्यांचा वाद बागलाणचे तहसीलदार कैलास चावडेयांच्याकडे ता.५ जुलै २०२४ रोजी दावा दाखल झाला होता.यात उत्तम शिवराम पानसरे हे वादी आणि काळू मधू गवळी आणि कारभारी निंबा कांदळकर हे प्रतिवादी होते.पहिली तारीख झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला तहसीलदार चावडे यांनी वादी प्रतिवादी या दोघांचे समुपदेशन करताना सांगितले की,वादविवाद ,कोर्टाच्या तारखा ,दाव्याचा खर्च यामुळे सदर रस्ता मोकळा करायला विलंब होणार आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांसह घरातील सदस्यांचा संबंध खराब होणार आहेत.शिवाय एकमेका शेजारी सातत्याने राहानारे बांधवांत वितूष्ट निर्माण होणार असल्याने आपण जर सामोपचाराने हा प्रश्न मिटवला तर खटला चालवायची गरज पडणार नाही असे तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना समजावले.यावेळी दोन्ही पक्षकार एकमेकाकडे वेगवेगळे स्वरूपाच्या अटीशर्ती टाकत होते.त्यात तहसीलदार चावडे यांनी स्वतः वेळ देऊन दोघांचे म्हणणे ऐकून दोघांची तडजोड घडवून आणली व एक शेतकरी याने दुसऱ्यासाठी काय करावे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्यासाठी काय करावे याबाबत दोघांमध्ये समेट घडवून देव मामलेदार यांच्या मूर्ती समोर शपथ घेऊन सदरचा वाद हा तडजोडीने मिटविण्यात आला.

यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला आहे.देव मामलेदार यांची शपथ घेतल्यानंतर…