महाराष्ट्र

सीआरपीएफ जवान शेखर गवई यांचा अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.

धुळे…..सीआरपीएफ जवान शेखर गवई यांच्या कार्याचा लेखाजोखा…….सा.पोलीस व्हिजन, धुळे … जिल्हा अकोला तालुका बाळापूर येथील रहिवासी तथा सीआरपीएफ जवान शेखर…

महाराष्ट्र

भारताच्या क्षितीजावरचा ध्रुवतारा निखळला!महान उद्योजक रतन टाटा अनंतात विलीन. धुळे……..सा.पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो) भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले!

टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले जमशेदपूर…

महाराष्ट्र

पुणे गँगरेप : पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. पुणे…. (सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न पुणेकरांना व सामान्य जनतेला पडला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे राज्य म्हटले जाते. या राज्यात पूर्वी महिला खूप सुरक्षित होत्या. महिलांचा आदर केला जात होता. मात्र वारंवार घडत असलेल्या पुणे शहरातील बलात्काराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करण्याची गरज आहे.पुण्यात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने सरकार आणि प्रशासन हादरले आहे. तास उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली असून, हे संशयित कुठेही दिसल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 14 पथके तयार केली आहेत.21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर हादरलेल्या पुणे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी डझनहून अधिक पथके तयार केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता मित्रासोबत डोंगरमाथ्यावर गेली होती. तेवढ्यात ३ जण तिथे आले. आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. यानंतर दोघांनाही डोंगरमाथ्यावरून खाली उतरवून डोंगराच्या खालच्या भागात नेण्यात आले. त्याला टेकडीवरून खाली उतरवल्यानंतर आरोपीने मुलाला त्याच्याच शर्टने आणि बेल्टने बांधले. हातपाय बांधण्यासोबतच त्याला आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापडही बांधले होते.

पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलाला नियंत्रित केल्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. टेकडीवर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पीडितेला कोणाचीही तातडीने मदत घेता…

महाराष्ट्र

रस्ता वहिवाट वरून दोन शेतकऱ्यांच्या भानगडी अखेर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कायमचे मिटले वाद. अंतापुर, ता. २५: सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…अमरावतीपाडा (ता. बागलाण) येथील दोन शेतकऱ्यांचा वहिवाटी बाबत अनेक दिवसांपासून वाद होत होता व वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर वाद सामोपचाराने मिटविल्याने वादावर पडदा पडला आहे.सदर शेतकऱ्यांचा वाद बागलाणचे तहसीलदार कैलास चावडेयांच्याकडे ता.५ जुलै २०२४ रोजी दावा दाखल झाला होता.यात उत्तम शिवराम पानसरे हे वादी आणि काळू मधू गवळी आणि कारभारी निंबा कांदळकर हे प्रतिवादी होते.पहिली तारीख झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला तहसीलदार चावडे यांनी वादी प्रतिवादी या दोघांचे समुपदेशन करताना सांगितले की,वादविवाद ,कोर्टाच्या तारखा ,दाव्याचा खर्च यामुळे सदर रस्ता मोकळा करायला विलंब होणार आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांसह घरातील सदस्यांचा संबंध खराब होणार आहेत.शिवाय एकमेका शेजारी सातत्याने राहानारे बांधवांत वितूष्ट निर्माण होणार असल्याने आपण जर सामोपचाराने हा प्रश्न मिटवला तर खटला चालवायची गरज पडणार नाही असे तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना समजावले.यावेळी दोन्ही पक्षकार एकमेकाकडे वेगवेगळे स्वरूपाच्या अटीशर्ती टाकत होते.त्यात तहसीलदार चावडे यांनी स्वतः वेळ देऊन दोघांचे म्हणणे ऐकून दोघांची तडजोड घडवून आणली व एक शेतकरी याने दुसऱ्यासाठी काय करावे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्यासाठी काय करावे याबाबत दोघांमध्ये समेट घडवून देव मामलेदार यांच्या मूर्ती समोर शपथ घेऊन सदरचा वाद हा तडजोडीने मिटविण्यात आला.

यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला आहे.देव मामलेदार यांची शपथ घेतल्यानंतर…

महाराष्ट्र

बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू अतिरक्तस्राव मुळे. मुंबई:—(सा.पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो ) बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करत पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले असून शवविच्छेदन अहवालामध्ये याचा खुलासा झाला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलीसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव झाला. अक्षय शिंदेचे सात तास…

महाराष्ट्र

धुळे शहरात गिरासे कुटुंबाने केले एकत्र सुसाईड धुळे शहर हादरले

धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… धुळे शहरांमध्ये बऱ्याच दिवसापासून शांतता होती. या धुळ्यामध्ये एकाच कुटुंबाने सुसाईड करणे ही…

महाराष्ट्र

“अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र” संस्थेच्या वतीने श्री. किशोर गणेश अडागळे यांचा सन्मान.

कळंबेश्वर पोस्ट निंबी (मालोकार) ता. जि.अकोला येथील कष्टकरी शेतकरी परिवारातील आणि “केन्द्रीय रिजर्व पोलीस बलाचे” जवान श्री. किशोर गणेश अडागळे…

महाराष्ट्र

शाकुंतल सदग्रंथ वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार

शाकुंतल सदग्रंथ वाचनालय खर्दे बु ता. शिंदखेडा या वाचनालयाव्दारे दि. १४/८/२०२४ रोजी संध्याकाळी खर्दे बु. येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.…

महाराष्ट्र

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधन साजराभडगाव (जावेद शेख)कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. कार्डशिट पेपर,चहाचे कप,दोरा,रंगीत मनी इत्यादी साहित्याचा उपयोग करून शाळेच्या मुलींनी स्वतः राख्या बनवल्या. मुलांनीही बहिणींना पेन, पेन्सिल,चॉकलेट अशा भेट वस्तू दिल्या. पारंपारिक पद्धतीने अत्यंत भावनिक वातावरणात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. फलक लेखन श्री अनंत हिरे सर यांनी केले. श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी रक्षाबंधन निमित्त सुरेख असे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सदैव बहिण भावाच्या पवित्र नात्याचे पालन करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, अनिता सैंदाणे,श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे,अनंत हिरे, सुयोग पाटील,सचिन पाटील, हरिचंद्र पाटील,किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.