धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांना दिवाळी निमित्त सा पोलीस व्हिजन धुळे तर्फे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी दिल्या शुभेच्छा🍁🍁🌹🌹🌹🖊️🖊️🖊️🖊️ धुळे…. पोलीस म्हटलं की त्यांना 24 तास आपल्या कर्तव्य काळात सण असो की इतर बंदोबस्त सतत परीवारापासून आपला आनंद हिरावून सामान्य नागरिकांचे सुरक्षेसाठी तैनात राहावे लागते.या आपल्या पोलीस बांधवांना महत्त्व पुर्ण सण दिवाळी मध्ये देखील आपल्या नोकरीत कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज राहावे लागते.म्हणुन या अशा पोलीस बांधवांची ही दिवाळी आपल्या नेमून दिलेल्या स्पॉटवर प्रत्यक्ष थांबून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस बांधव करत असतात. धुळे शहरातील मुख्य गोपाल टी जवळील सिग्नल जवळ प्रचंड गर्दी असते. दिवाळी सणामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते ती सोडवून नागरिकांना वाहतुकीसाठी सोय व्हावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाने सदैव हे आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल श्री मनोहर (रावसाहेब) महाले,पो.काँ. महेश सूर्यवंशी, पो काँ.मनोज बोरसे,पो.काँ. अजय पाटील, पो काँ.विनोद पाटील, हे सर्व धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचारी यांना साप्ताहिक पोलीस व्हिजनचे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंखे यांनी दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व पोलिसांनी चिरंजीव यश साळुंखे याची झी 24 तास मीडिया मुंबई येथे परमनंट जॉब झाल्याने त्याला धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांच्या वतीने त्याचे हार्दिक स्वागत करण्यात आले व त्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया, मुंबई वतीने या सर्व पोलिसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांना या गोष्टीचा अभिमान वाटला आणि त्यांनी साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया 24 तास मुंबई चे आभार व्यक्त केले*

प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहोळा अकोला येथे संपन्नकाल दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सोहोळा अकोला येथे अकोला जिल्हा काँग्रेस कार्यालय “स्वराज्य भवन” येथे संपन्न झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यभरातून मोठया संख्येने सर्व स्तरावरील शिक्षक आले होते.या पुरस्कार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. धीरज भाऊ लिंगाडे व अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. किरण भाऊ सरनाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे उपस्थित होते. “शिक्षक हा स्वतःअनेक गुणांनी संपन्न असतो. विद्यार्थ्यांना शिकवीत असता तो परिसरातील वातावरणाशी एकरूप होतो , ते अंगिकरतो व त्याच्या योग्य उपयोग आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुंनाना वाव देण्यासाठी व स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी करून घेत असतो. अशी अनेक नवनवीन क्षेत्रे आहेत तिथे शिक्षक हा स्वतःस वाहून घेतो व एक नवीन कलाकृती जगासमोर आणत असतो..अश्या होतकरू व आदर्श शिक्षकांच्या अंगी असलेल्या कला गुणाना शाबासकी देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करीत असते ” असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणातून केले व प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग हा महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व न्याय्यमागण्यांसाठी नेहमी त्यांच्या पाठीशी असतो असेही प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमास मा. आमदार धीरज भाऊ लिंगाडे मा.आमदर किरण भाऊ सरनाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले व त्यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे आपल्या भाषणातून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश काँग्रेस सचिव व शिक्षक विभाग राज्य मुख्य कार्याध्यक्ष प्रकाश तायडे यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून उपस्थितांचे आभार मानलेत. कार्यक्रमास अकोला शहर काँग्रेस चे शहर अध्यक्ष डॉ. पाटील, ग्रामीण अध्यक्ष श्री. अशोकराव, राज्य शिक्षक विभागाचे उपाध्यक्ष श्री. वाहुर वाघ सर, श्री.अमर पाटील इतर अनेक प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या कुटुंबातील व्यक्तीस आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तो आनंदाचा व कौतुकाचा सोहोळा पाहण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अकोला येथे काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न

धुळे….. (बातमी पत्र सा पोलीस व्हिजन धुळे)..महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा […]

अकोला येथे काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार

धुळे….. (बातमी पत्र सा पोलीस व्हिजन धुळे)..महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा […]

नंदुरबार… क्राईम न्यूज ब्युरो..सा पोलीस व्हिजन धुळे…. सामान्य माणूस हा आपल्या या ना त्या कामा निमित्त शासकीय कार्यालयात जात असतो परंतु तेथील भ्रष्ट काही वृत्तीचे नोकरदार हे काहीतरी चिरीमिरी घेतल्याशिवाय सामान्य माणसाचे काम होऊच द्यायचे नाही या मानसिकतेने तेथे आपली नोकरी करत असतात. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून तात्काळ मोठे होण्याचे स्वप्न ते बाळगून असतात. आणि याच मोहाने एक ना एक दिवस ते लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती सापडतात.असाच प्रकार नंदुरबार येथे घडला यात तक्रारदार पुरुष, वय- ५५ वर्षे, रा. रनाळे खुर्द , पोस्ट भादवड, ता. जि. नंदुरबार.आरोपी १) जयेश शंकर तेजी , वय ४० वर्ष , नोकरी सफाईगार, ग्रामीण रुग्णालय धानोरा.२) तुकाराम भिला भोई , वय ४३ , खाजगी चालक , रा नवी भोई गल्ली , नंदुरबार.▶️ लाच मागणी कारण:- तक्रारदार हे एस टी महामंडळ नंदुरबार येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तक्रारदार हे मे २०२३ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. तक्रारदार यांची प्रकृती आता व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर हजर व्हावयाचे होते , यासाठी तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट ची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार हे फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट साठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान आलोसे क्रमांक १ याने तक्रारदार यांना फोन करून व स्वतः जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे क्लर्क असल्याचे भासवुन , तसेच त्याचा साथीदार आरोपी खाजगी ईसम हा डॉक्टर असल्याचे भासवुन , जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फाॅर ड्युटी सर्टिफिकेट मिळून देतो असे सांगून, त्या बदल्यात तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे क्रमांक १ याने तक्रारदाराकडून प्रथमतः १२,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रुपयांची मागणी केली आहे. आज रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र १ याने तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फाॅर ड्युटी सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष १०,०००/- रुपये एवढी रक्कम स्वीकारली, म्हणून गुन्हा.हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.सापळा पर्यवेक्षण अधिकारीराकेश आ. चौधरीपोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार सापळा अधिकारी:-पोनि/माधवी वाघ

सदर सापळा कार्यवाही व मदत पथक मध्ये पोनि/समाधान वाघ , पोहवा/अमोल मराठे, पोहवा/देवराम गावित, पोहवा/विजय […]

सेवापूर्ती निमित्त आहे,मात्र खऱ्या अर्थाने आपले कर्तव्य बजावत अखेरपर्यंत सुखरूप नोकरी पूर्ण करून जो सेवानिवृत्त होतो तो खरा भाग्यवान 🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 आबासाहेब आढावे एन बी पर्यवेक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा व अभिनंदन साठी खास मनोगतखास आमच्या सर्वांवर प्रेम करणारे सदाबहार व्यक्तिमत्व माननीय पर्यवेक्षक आबासाहेब नरेंद्र भटू आढावे सर, जे आमच्या अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक किमान कौशल्य विभाग, धुळे येथील कर्मचारी आज दिनांक..31-10-2023 रोजी आपल्या मोठ्या पल्याची नोकरी पुर्ण करत वयानुरूप आपल्या नोकरी मधुन सेवानिवृत्त होत आहेत.आजचा हा त्यांचा दिवस आनंदाचा व मागिल सर्व आठवणी डोळ्यासमोर पुन्हा स्मरण करून केलेले कार्याचा सतत स्मरण करून पुढील उरलेले आयुष्य आपल्या परीवार साठी जगण्यासाठी मोकळे झाले आहेत. एरवी आबासाहेब आढावे सर यांना आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कै. डॉक्टर अण्णासाहेब सुधाकर जी बोरसे यांनी जीवापार प्रेम करून संस्थेत नोकरी दिली 1992 पासून विनाअनुदान संस्थेवर ग्रामीण भागातील रानमळा तालुका जिल्हा धुळे येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून अण्णा साहेबांनी प्रेमाने त्यांना ही नोकरी दिली. पूर्वीपासून भोळे भाबडे स्वभावाचे आबासाहेब हे मुख्याध्यापक तर झालेच पण अण्णा साहेबांचा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही असे चाकोरीबद्ध चालण्याचा त्यांनी अथक प्रयत्न केला. मात्र भोळ्या स्वभावाचे आबांचे या नात्या कारणाने कुणीतरी या ना त्या चुगल्या लावून आबासाहेब नरेंद्र आढावे यांना खाली खेचण्याचे प्रयत्न होत गेले. याच कारणाने आबासाहेब यांना राजीव गांधी येथे धुळे शहरात मुख्याध्यापक म्हणून बदली केली गेली तेथील शहरातील प्रशासन चालवण्यासाठी कठीण असल्याने बाबासाहेबांना अखेर तुम्हाला ते पेलवणार नाही.असे सांगत थेट रिव्हर्शन घेण्याची अट घालून त्यांना अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धुळे येथे पर्यवेक्षक पदावर आणण्यात आले. वास्तविक अण्णासाहेबांचे अतिशय प्रेम या व्यक्तीवर होते. पण चांगल्या कामात, चांगल्या व्यक्तींना नेहमी ब्रेक ज्याला आपण धावत्या गाडीच्या चाकाला वट लावणे म्हणतो तो प्रकार आढावे आबांच्या च्या बाबतीत इतर व्यक्तिंकडुन केले गेले.एखादी छोटी शाळा ते मुख्याध्यापक म्हणून सहज सांभाळुन घेऊन जाणारे ही होते.पण इतरांनी ते होऊ दिलं नाही. मात्र मनापासून डॉक्टर अण्णासाहेब व डॉ ताईसाहेब हे आढावे सरांवर सतत प्रेम करणारे व्यक्तिमत्व ठरले. त्यांचा यात दोष नव्हता हे आढावे सरांनी अनुभव ले होते.त्यांनी तेव्हापासून पर्यवेक्षक पदाची धुरा आनंदाने स्वीकारली ती फक्त आणि फक्त आपल्या हृदयात असलेले डॉक्टर अण्णासाहेब यांच्या प्रेमापोटी. कारण त्यांना माहीत होते त्यांचे जे नुकसान झाले ते इतरांनी केले होते. पण यातही ते सदैव आनंदाने आपली नोकरी करत असताना आपल्या विनोदी स्वभावातून कितीही संकट असो टेन्शन असो ते अगदी विनोदी याच्यातून सोडवत आजचा दिवस आनंदी कसा होईल अशा पद्धतीने आपली नोकरी करणारा एक चांगला शिक्षक म्हणजेच आबासाहेब आढावे सर होत. कुणी रागावले तरी सहन करून घेणारे आढावे आबा,राग त्यांनी कुणाचाही मानला नाही. आणि झालेल्या नुकसानीची खंतही केली नाही. स्वतःला डायबिटीज असूनही टेन्शन सहज जिरवणारा व्यक्ती म्हणजे आढावे सर, रोजची दैनंदिनी लिहिणे ऑनलाईन शालेय पोषण आहार नोंदणी करणे, रजेवरील शिक्षकांचे बुलेटीन लावणे, वर्गावर कुणी नसेल तर स्वतः जाऊन थांबणे, विशेष म्हणजे आपले स्वतःचे तास स्वतः घेणे, आणि कंटाळा आला तर सरळ पिटीचा तास म्हणून ग्राउंडवर मुलांना आणणं ही आबांची हातोटी होती. आपल्या शाळेतील शिक्षकांना नेहमी प्रेमाने बोलणे आणि हसत खेळत भाऊ दादा म्हणून काम करून घेण्याचा प्रयत्न करणे मुख्याध्यापक यांची जी जबाबदारी असते ती हलकी करण्याचा प्रयत्न पर्यवेक्षक या नात्याने आबासाहेब करून घेत होते. चांगल्या कामाची थाप शिक्षकांच्या पाठीवर देण्याचं काम आढावे सर करत होते. जे खरं असेल त्याला खरं म्हणणं हे धैर्य त्यांच्यामध्ये मी स्वतः पाहिलेले आहे. आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांना आवर्जून सांगत होते. आपल्या कुटुंबापेक्षा शाळा हेच माझे खरे कुटुंब आहे असे म्हणणारे आबा मी अनुभवले आहेत. संस्थेविषयी प्रेम संस्थाचालक यांच्या विषयी आदर, चांगल्या शिक्षकांच्या बाबतीत सदैव मोठेपणा दाखवून त्यांचा आदर करणारे व्यक्तिमत्व आबा हे मी अनुभवले आहेत. शाळा ही चांगली केव्हा राहते!! ज्या शाळेत मुख्याध्यापक पारखी नजरेचा कोणत्या कामाचा कोणता शिक्षक आहे त्याचा अभ्यास करून त्यांना त्या पद्धतीने शाळेची प्रगतीसाठी वापर करून घेणे हे ज्याला जमते तो खरा मुख्यध्यापक. आपण स्वतः करतो आणि मग दुसऱ्याला सांगतो तर समोरचा व्यक्ती काम ऐकतोच हे आढावे सर यांचे कडुन शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून नव्हे तर त्यांचे पालक म्हणून आढावे सर सदैव विद्यार्थ्यांना प्रेम करत होते. डायबिटीज मुळे एखाद्या वेळेस चिडचिडपणा देखील आबांचा होत असे त्यातून एखाद्या विद्यार्थ्याने कुणाचे नाव घेतले आणि ती तक्रार आबांकडे आली तर त्याला हमखास शिक्षा करण्याचे धाडस आबांकडे होते.ताईसाहेब आणि आण्णासाहेब, दादासाहेब अभय बोरसे, ताईसाहेब माधुरी ताई यांना कायम श्रध्दास्थान म्हणून पहाणारे आढावे सर यांना मी पाहिले आहे.तात्यासाहेब बी एम पाटील यांच्या करवी सुचनांचे पालन देखील करणारे आढावे आबा आज जरी सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांची ओळख व आठवणी सदैव अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्था परीवार मध्ये कायम तेवत राहणार आहे. आठवण नेमकी कुणाची ठेवतात!!! ज्यांनी ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर उदार प्रेम केले त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्यातील कौशल्य गुण समजून घेतले आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे सदैव स्मरणात राहतात. आणि सेवानिवृत्तीनंतर आपण तेच खरे कमावलेले धन असते. पैसा कोणीही कमावतो पण माणूस कसा होता, कसा जगला, का जगला, कुणासाठी जगला, कुणाला किती उपयोगात आला. स्वतःचे निर्णय सक्षम घेणारा व्यक्ती हा सदैव समाज व आपल्या मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्या मनात कायमस्वरूपी ठसलेला असतो.कै. अण्णासाहेब डॉक्टर सुधाकर बोरसे हे अतिशय पारखी नजरेचे व्यक्तिमत्व अपार स्मरणशक्ती आणि कौशल्य असलेल्या व्यक्तीचे सतत गुणगान करणारे, व पाठ थोपटून आशिर्वाद देणारे महान विभूती आपल्या अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्था अध्यक्ष म्हणून सदैव हृदयात राहतीलत राहुन पुढे अतिशय प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय ताईसाहेब डॉ शालिनीताई बोरसे यांनी खऱ्या कलात्मक व कौशल्य पूर्ण आपल्या कर्मचारींवर मातृत्व प्रेम केलेले आहे ते कदापि आपण कुणीही विसरू शकत नाही आणि या चांगल्या परिवारातील संस्थाप्रमुखांच्या शुभ आशीर्वाद खाली आज ज्यांनी ज्यांनी नोकरी केली आणि आज सेवानिवृत्त होत आहेत ते सर्व भाग्यशाली म्हणावे लागतील.आज शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्गातून अजून एक महिला व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहेत श्रीमती ज्योती सोनारताई यांनी अखेर पर्यंत माननीय डॉक्टर अण्णासाहेब व ताईसाहेब व संपूर्ण बोरसे कुटुंब यांचे सर्व कौटुंबिक भोजन असो की इतर कामे आजवर प्रामाणिकपणे केली आहेत त्यांची सेवानिवृत्ती आज झाली आहे त्यांना देखील सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.व पुढील वाटचालीस सर्व सेवानिवृत्त आपल्या अभय परिवारातील प्रत्येक घटकाला हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटी जावो आरोग्य उत्तम राहो या शुभेच्छा देतो*🌹🌹🌹🌹🌹✒️✒️✒️ *प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे *

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक!! धनगर समाजाने ही दिला पाठींबा जरांगे पाटील म्हणाले मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणाले दोन दिवसात देतो आरक्षण??मराठा पाठोपाठ धनगर समाजही आक्रमक सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याची सुरुवात?✍️✍️✍सा पोलीस व्हिजन न्युज मिडिया……… सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षण मुद्दा ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असुन त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर गावोगावी मराठा समाज आरक्षण मिळत नाही म्हणून आक्रमक होऊन सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे तसे बॅनर गावागावात दिसू लागलेत राजकीय पक्षाचे नेते गावात आले तर त्यांना खडे बोल सुनवतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गावात प्रवेश मिळणार नाही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज ही आक्रमक होत आहे धनगर समाजानेही सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत आहेत. तसेच बॅनर बाजी धनगर समाजही करु लागला आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून तर धनगर समाजाने पश्चिम महाराष्ट्रात गाव बंदीची घोषणा करुन सुरुवात केली आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावण भूमीतून मराठा आणि धनगरांचे दुखणे एकच आहे. धनगर समाजाला घटनेतच आरक्षण मिळाले आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी धनगड आणि धनगर अशी दुरुस्ती करुन र चा ड असा फरक झाल्यामुळे ७० वर्षे झाले तरी न्याय मिळत नाही. हेच दुर्दैव आहे राज्यकर्ते शासन निर्णय घेणार नसेल तर राज्यात मराठा समाज एक नंबर आहे तर धनगर समाजही दोन नंबर वरती आहे मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला तर आरक्षण मिळेल परंतु आरक्षण मागणारे नाही तर देणारे होतील त्यामुळे सरकारने जास्त वेळ न घेता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण लागू करावे…..

सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रश्न संच वाटप गट साधन केंद्र सुंदरदे ता जि नंदुरबार येथील केंद्रातील शाळांना शासनाच्या संकलित चाचणी परीक्षा प्रश्नसंच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रत्यक्ष प्रश्न संच वाटप सुंदरदे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख बापुसाहेब देसले सो.यांनी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास आर सुर्यवंशी सर,श्राफ संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक बापूसाहेब मिलींद माळी,सोबत सह शिक्षक श्री धनगर सर यांना प्रश्न संच वाटप करताना दिसत आहेत.शुक्रवार दिनांक.27-10-2023 रोजी सुंदरदे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद नंदुरबार शालेय शिक्षण विभाग व्दारा शिक्षकांसाठी शिक्षक परीषद चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळा या शिक्षक परीषद साठी उपस्थित होते.शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती साधन उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी उपस्थित शिक्षकांना दुपारच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट केली होती.सदर संकलित चाचणी परीक्षा सोमवार दिनांक..30-10-2023 ते 1-11-2023 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती 100% ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे.भाषा, गणित, इंग्रजी या मुख्य तीन विषयांच्या या परीक्षा होणार सोबतच नियमित प्रथम सत्र परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी द्यायचीच आहे असे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी या वेळी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️सा पोलीस व्हिजन धुळे

धुळे जि. प. शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात.तक्रारदार शिक्षकाच्या हिंम्मतीला सलाम!!

धुळे – शिक्षक म्हटलं की कुणी ही त्याला जस वाकवायच तसं वाकवण्याच काम काही अधिकारी, […]