मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक!! धनगर समाजाने ही दिला पाठींबा जरांगे पाटील म्हणाले मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणाले दोन दिवसात देतो आरक्षण??मराठा पाठोपाठ धनगर समाजही आक्रमक सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याची सुरुवात?✍️✍️✍सा पोलीस व्हिजन न्युज मिडिया……… सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षण मुद्दा ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असुन त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर गावोगावी मराठा समाज आरक्षण मिळत नाही म्हणून आक्रमक होऊन सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे तसे बॅनर गावागावात दिसू लागलेत राजकीय पक्षाचे नेते गावात आले तर त्यांना खडे बोल सुनवतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गावात प्रवेश मिळणार नाही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज ही आक्रमक होत आहे धनगर समाजानेही सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत आहेत. तसेच बॅनर बाजी धनगर समाजही करु लागला आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून तर धनगर समाजाने पश्चिम महाराष्ट्रात गाव बंदीची घोषणा करुन सुरुवात केली आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावण भूमीतून मराठा आणि धनगरांचे दुखणे एकच आहे. धनगर समाजाला घटनेतच आरक्षण मिळाले आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी धनगड आणि धनगर अशी दुरुस्ती करुन र चा ड असा फरक झाल्यामुळे ७० वर्षे झाले तरी न्याय मिळत नाही. हेच दुर्दैव आहे राज्यकर्ते शासन निर्णय घेणार नसेल तर राज्यात मराठा समाज एक नंबर आहे तर धनगर समाजही दोन नंबर वरती आहे मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला तर आरक्षण मिळेल परंतु आरक्षण मागणारे नाही तर देणारे होतील त्यामुळे सरकारने जास्त वेळ न घेता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण लागू करावे…..

सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रश्न संच वाटप गट साधन केंद्र सुंदरदे ता जि नंदुरबार येथील केंद्रातील शाळांना शासनाच्या संकलित चाचणी परीक्षा प्रश्नसंच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रत्यक्ष प्रश्न संच वाटप सुंदरदे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख बापुसाहेब देसले सो.यांनी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास आर सुर्यवंशी सर,श्राफ संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक बापूसाहेब मिलींद माळी,सोबत सह शिक्षक श्री धनगर सर यांना प्रश्न संच वाटप करताना दिसत आहेत.शुक्रवार दिनांक.27-10-2023 रोजी सुंदरदे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद नंदुरबार शालेय शिक्षण विभाग व्दारा शिक्षकांसाठी शिक्षक परीषद चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळा या शिक्षक परीषद साठी उपस्थित होते.शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती साधन उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी उपस्थित शिक्षकांना दुपारच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट केली होती.सदर संकलित चाचणी परीक्षा सोमवार दिनांक..30-10-2023 ते 1-11-2023 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती 100% ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे.भाषा, गणित, इंग्रजी या मुख्य तीन विषयांच्या या परीक्षा होणार सोबतच नियमित प्रथम सत्र परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी द्यायचीच आहे असे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी या वेळी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️सा पोलीस व्हिजन धुळे

धुळे जि. प. शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात.तक्रारदार शिक्षकाच्या हिंम्मतीला सलाम!!

धुळे – शिक्षक म्हटलं की कुणी ही त्याला जस वाकवायच तसं वाकवण्याच काम काही अधिकारी, […]

सा पोलीस व्हिजन धुळे क्राईम… दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध

दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध दिड वर्षांपूर्वी हरवलेला […]

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी—————-

पिंपळनेर….. प्रतिनिधी सा पोलीस व्हिजन धुळे…कर्म.आ.मा.पाटील, कला, वाणिज्य व कै विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी […]

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छताही सेवा अंतर्गत पिंपळनेर पोलीस्टेशन येथे श्रमदान.—-‐—————————————कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाने पिंपळनेर पोलिस्टेशन येथे पोलिस्टेशन च्या आवारातील केरकच-याची 1तास साफसफाई केली.प्रारंभी प्रभारी प्राचार्य के.डी.कदम यांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.स्वच्छतेवर घोषणा देत रॅली पिंपळनेर पोलिस्टेशन ला गेली.तेथे पोलिस मित्रांसोबत एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी आवारातील साफसफाई केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी व विद्यार्थ्यांनी पोलीसांच्या जीवन कार्या बदल एक गीत सादर केले.पिंपळनेर पोलिस्टेशनचे पी.एस.आय.मा.पारधी साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छता असली तर आपले आरोग्यतंदुरुस्त राहते.बाह्य स्वच्छता जेवढी महत्वाची तेवढीच आंतरीक स्वच्छता देखील महत्त्वाची असते.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले घर,आपले अंगण,आपला परिसर,आपली गल्ली,आपले महाविद्यालय,आपले गाव व आपली नदी कसे स्वच्छ राहील यासाठी कटिबद्ध असायला हवे.आपोआप स्वच्छता राखली जाऊन संपूर्ण भारत स्वच्छ होईलअसे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास मा.पी.एस.आय श्री.पारधी साहेब, प्राचार्य श्री.के.डी.कदम सर, पत्रकार श्री.सुभाष जगताप,सर्व पोलीस बंधु,होमगार्ड बंधु भगिनी व महाविद्यालयातील डाॅ.बी.सी.मोरे,डाॅ.एन.बी.सोनवणे,प्रा.सी.एन.घरटे,डाॅ.खरात ए.जी. प्रा.डी.बी.जाधव,प्रा.डाॅ.वाय.एम.नांद्रे प्रा.सी.एन.घरटे,प्रा.पी.एम.सावळे प्रा.हितेश वानखेडे, प्रा.पवन निकम ,प्रा.सुर्यवंशी,श्री.सुनील गुरव, श्री.संदिप अमृतकर,श्री.के.एन.कुवर,श्री.नरेंद्र ढोले श्री.ठाकरे, श्रीमती ठाकूर मॅडम,हे देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोलिस्टेशन येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा महाविद्यालयातील बागेची व परिसरातील साफसफाई करण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रा.पवन निकुम, मौनेश सोनवणे,कु.क्षमा पांडे,कु.चेतना निकुम, कु.डिंपल गांगुर्डे.कु.सुलोनी राऊत,कु.रोशनी ढोले,कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.प्रगती गोसावी,भावसिंग, राकेश,संतोष,दाविद, करण या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. एस.एन तोरवणे यांनी आभार मानले..

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छताही सेवा अंतर्गत पिंपळनेर पोलीस्टेशन येथे श्रमदान.—-‐—————————————कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाने पिंपळनेर पोलिस्टेशन येथे पोलिस्टेशन च्या आवारातील केरकच-याची 1तास साफसफाई केली.प्रारंभी प्रभारी प्राचार्य के.डी.कदम यांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.स्वच्छतेवर घोषणा देत रॅली पिंपळनेर पोलिस्टेशन ला गेली.तेथे पोलिस मित्रांसोबत एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी आवारातील साफसफाई केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी व विद्यार्थ्यांनी पोलीसांच्या जीवन कार्या बदल एक गीत सादर केले.पिंपळनेर पोलिस्टेशनचे पी.एस.आय.मा.पारधी साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छता असली तर आपले आरोग्यतंदुरुस्त राहते.बाह्य स्वच्छता जेवढी महत्वाची तेवढीच आंतरीक स्वच्छता देखील महत्त्वाची असते.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले घर,आपले अंगण,आपला परिसर,आपली गल्ली,आपले महाविद्यालय,आपले गाव व आपली नदी कसे स्वच्छ राहील यासाठी कटिबद्ध असायला हवे.आपोआप स्वच्छता राखली जाऊन संपूर्ण भारत स्वच्छ होईलअसे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास मा.पी.एस.आय श्री.पारधी साहेब, प्राचार्य श्री.के.डी.कदम सर, पत्रकार श्री.सुभाष जगताप,सर्व पोलीस बंधु,होमगार्ड बंधु भगिनी व महाविद्यालयातील डाॅ.बी.सी.मोरे,डाॅ.एन.बी.सोनवणे,प्रा.सी.एन.घरटे,डाॅ.खरात ए.जी. प्रा.डी.बी.जाधव,प्रा.डाॅ.वाय.एम.नांद्रे प्रा.सी.एन.घरटे,प्रा.पी.एम.सावळे प्रा.हितेश वानखेडे, प्रा.पवन निकम ,प्रा.सुर्यवंशी,श्री.सुनील गुरव, श्री.संदिप अमृतकर,श्री.के.एन.कुवर,श्री.नरेंद्र ढोले श्री.ठाकरे, श्रीमती ठाकूर मॅडम,हे देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोलिस्टेशन येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा महाविद्यालयातील बागेची व परिसरातील साफसफाई करण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रा.पवन निकुम, मौनेश सोनवणे,कु.क्षमा पांडे,कु.चेतना निकुम, कु.डिंपल गांगुर्डे.कु.सुलोनी राऊत,कु.रोशनी ढोले,कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.प्रगती गोसावी,भावसिंग, राकेश,संतोष,दाविद, करण या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. एस.एन तोरवणे यांनी आभार मानले..

शेवाळी दा. ग्रामपंचायत सरपंच पदी महिला उमेदवार सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध निवड धुळे..सा पोलीस व्हिजन द्वारा… धुळे जिल्हा व साक्री तालुक्यातील नावलौकिक असलेले नागपूर सुरत महामार्गावरील शेवाळी दातर्ती या गावाच्या ग्रामपंचायतीस एक आदर्श इतिहास आहे. या गावात गुण्यागोविंदाने नागरिक विविध पक्षातील गट तट विसरून ग्रामपंचायतच्या बाबत एक चांगला आदर्श निर्माण करून ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची मंगळवारी सर्व सदस्य यांच्या निर्णयानुसार एकमताने बिनविरोध निवड करून पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे. या निवडीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील गावकऱ्यांनी केला आहे.शेवाळी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच पदी आता सुरेखा साळुंके या माझी साखरी पंचायत समितीचे सभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंखे यांच्या त्या काकू आहेत. नितीन साळुंके यांच्या प्रचंड राजकीय अनुभवातून त्यांना नक्कीच या ग्रामपंचायतीचा व ग्रामस्थांचा विकास कामाचा फायदा होणार आहे. शेवाळी दातरती ग्रामपंचायत मावळत्या सरपंच चित्राताई प्रदीप नांद्रे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या या राजीनाम्यामुळे सदर सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. त्यानुसार सरपंच पदाची फेर निवडणूक कार्यक्रम 26सप्टेंबर 2023 रोजी मंडळ निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष गजानन दगडू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत शेवाळी येथील प्रांगणात नवीन सरपंच पदाची निवडणूक पार पडली. सदर निवडणूक ही बिनविरोध एकमताने जाहीर झाल्याने एकच जल्लोष झाला. शेवाळी ग्रामपंचायतचे सरपंच पद ही महिला प्रवर्गातील राखीव असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहभाग घेण्यात येणार असल्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी तलाठींच्या वतीने सर्व 11 ग्रामपंचायत सदस्यांना लेखी नोटीसद्वारे कळविण्यात आले होते त्यानुसार शेवाळी ग्रामपंचायतचे सर्व 11 सदस्य हजर होते यावेळी सरपंच पदासाठी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने मंडळ अधिकारी शेवाळी तथा अध्यक्ष अधिकारी गजानन दगडू सोनवणे यांनी सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध एकमताने निवड जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायत शेवाळीचे ग्राम विकास अधिकारी श्री एम.जी सोनवणे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन, सचिव, सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्यकारी मंडळ सदस्य, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे प्राध्यापक शिक्षक शिक्षिका गावकरी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, जातीने उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच पदी निवड झाल्या नंतर नवनिर्वाचित महिला उमेदवार सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महिला सरपंच यांनी गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावचा विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरेखा साळुंके यांनी दिली आहे. शेवाळी गावातील वार्ड क्रमांक चार (खळवाडी) येथील शिवबाबा केंद्राच्या मागील दोन गल्ल्यांची रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत ते तातडीने व्हावेत यासाठी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांनी करून द्याव्यात अशी मागणी वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांनी केली आहे. या कामात लक्ष लवकरात लवकर घालावे आणि रस्त्यांचे कामे चांगल्या प्रकारे व्हावेत अशी आशा ग्रामस्थांनी सा पोलीस व्हिजन धुळे कडे व्यक्त केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक हे नक्कीच याकडे लक्ष घालतील असा विश्वास साप्ताहिक पोलीस व्हिजन ला आहे.

लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाईनिषेधार्ह आणि संतापजनक :एस.एम.देशमुख

माध्यमांचा आवाज बंद करण्याचा देशात सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो आहे.. लोकशाही न्यूज चॅनल पुढील 72 […]

ग्रामसेवक पुरस्कार साठी मलांजण येथील ग्रामसेविका श्रीमती रुपाली देवरे यांची सन 2017-2018 साठी शासनाने निवड केली आहेधुळे…. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागात ग्रामपंचायत म्हणजे विधिमंडळ असते. ग्राम सुधार व गावातील सर्व प्रशासकीय कामांमध्ये ग्रामपंचायत चे महत्वपूर्ण कार्य असते. साक्री तालुक्यातील मलांजन या गावातील ग्रामपंचायत सण 2017- 18 या वर्षासाठी उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रशासक ग्रामसेविका म्हणून श्रीमती रूपाली देवरे उर्फ सौ.रूपाली किरण सोनवणे (मराठे) यांची निवड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे आदर्श ग्रामसेवक दिला जातो.हा पुरस्कार दोन ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आठ वर्षातील पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद तर्फे ग्रामसेवकांना सन 2015 16 पासून पुरस्कार वाटप झाले नव्हते त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजी होती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी पुरस्कार वाटपासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यानुसार निवड समितीतर्फे सीओ शुभम गुप्ता यांनी पुरस्काराची घोषणा केली येत्या 2 ऑक्टोबरला सन 2015 ते 2023 या आठ वर्षातील 32 ग्रामसेवकांना पुरस्कार दिले जातील.सौ रुपाली किरण देवरे या मलांजण येथील श्री तानाजी गंगाराम सोनवणे (मराठे) व सौ मंदाकिनी तानाजी सोनवणे (मराठे ) यांच्या सुनबाई असुन सामाजिक कार्यकर्ते श्री किरण तानाजी मराठे यांच्या धर्मपत्नी आहेत.ग्रामसेविका रुपाली देवरे यांनी व सरपंच, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या ग्रामपंचायत मार्फत आपले मलांजन अतिशय आदर्श गाव असे सुधारणा करून शासनाचा पुरस्कार प्राप्त केला आहे आणि याच कार्यातून त्यांनी आपल्या ग्रामपंचायतचा हा पुरस्कार मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.नेहमी सहकार्य करणारे प्रेरणा स्थान श्रीमान ऋषिकेश मराठे व त्यांच्या धर्मपत्नी सरपंच यांचे सतत सहकार्य असते.सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी श्रीमती रुपाली देवरे ग्रामसेविका यांचे अभिनंदन केले आहे.सा.पोलीस व्हिजन तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.