यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला आहे.
देव मामलेदार यांची शपथ घेतल्यानंतर तहसीलदार चावडे यांनी आपल्या दालनात स्वतःच दोन्ही शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी
शेत व रस्त्याचे वाद तडजोडीने जागेवरच मिटवून सुखा समाधानाने राहुन शेती क्षेत्रात उत्तम पद्धतीने प्रगती करावी असे आव्हान चावडे यांनी केले आहे.
(संत देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पवित्र पुण्यभूमीत आजपर्यंत सर्व विभागातील अनेक उत्तम अधिकारी होऊन गेलेत त्यातील एक कर्तव्यदक्ष आदर्शवत अधिकारी म्हणून सुरुवातीला प्राथमिक शिक्षकाचे काम करून नंतर आपल्या जिद्द व मेहनतीने परीक्षा देऊन कैलास चावडे तहसीलदार म्हणून बागलाण तालुक्याला लाभले आहेत.
त्यांनी आजपर्यंत अशा प्रकारे अनेक शेती व इतर वाद सामोपचाराने मिटवले आहेत.
आपले प्रशासकीय पद सांभाळून शैक्षणिक संस्था ,शाळा ,कॉलेज व इतर ठिकाणी उपस्थित राहून महत्त्वपूर्ण आपल्या विनोदी व मार्मिक शब्दांची रचना करून मार्गदर्शन करीत असल्याने प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी आपले एक स्थान मिळवले आहे..
खरोखरच जनतेमध्ये मिसळून जनतेचे विविध प्रश्न सोडवून एक प्रशासकीय अधिकारी कसा असावा त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तहसीलदार कैलासजी चावडे साहेब..सदर बातमीपत्र पत्रकार व निसर्गमित्र श्री अरुणकुमार भामरे , सटाणा यांनी सा पोलीस व्हिजन धुळे यांना कळवले आहे. छायाचित्र… अमरावतीपाडा येथील शेतकऱ्यांनी रस्ता वहिवाटीचे वाद मिटविल्याने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करताना तहसीलदार कैलास चावडे.(छायाचित्र- अरुणकुमार भामरे)
