गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात अखेर अडकले. नंदुरबार… क्राईम न्यूज ब्युरो साप्ताहिक पोलीस व्हिजन…… शासकीय अधिकारी यांना सामान्य जनतेचे सेवक म्हटले जाते, परंतु या सेवकांना या सेवेचा मोबदला म्हणून शासन चांगल्या प्रकारे पगार व सर्व शासन भत्ते देत असते. शासनाकडून यांना इथून तिथे फिरण्यासाठी शासकीय गाडी व चांगल्या प्रकारे आपल्या कार्यालयातील सजलेली केबिन दिली जाते. पण यांची या शासन वेतन व भत्त्यांवर तरी देखील पोटा भरत नाहीत. यांना कोणतेही सामान्य माणसाचे काम करताना लाच मागितल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय चालत नाही. यांचे दलाल हे नेमलेले असतात. या दलालामार्फत किंवा नेमलेल्या पंटरांमार्फत कोणतीही शासकीय कार्यालय असो तेथे चिरीमिरी घेतल्याशिवाय व यांची कमिशन काढल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे सत्य नाकारता येत नाही.शिक्षण विभागात देखील काही पंटर शिक्षकांच्या, मुख्याध्यापक यांच्या बेकायदेशीर मंजुरीसाठी चिरीमिरीच्या प्रकारात मिळालेले असतात असे शिक्षक वर्ग कडुन बोलले जात.असेच गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात सहज अडकले. अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रकमेसाठी 26 हजारांची लाच स्वीकारतांना अक्कलकुवा पंचायत समिती गट विकास अधिकारी सह सहाय्यक लेखाधिकारी हे रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. यामुळे तक्रारदाराकडून यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही म्हणून बिल काढून देण्यासाठी 26 हजारांची मागणी त्यांच्याकडून केली. तक्रारदाराकडून सोळा हजार रुपये स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे यांना आठ हजार रुपयांची रोकड घेताना लाच लुचपत प्रतिबंधक च्या पथकाने रंगेहात पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले. सदर कार्यवाही पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, हेमंत कुमार महाले, सुभाष पावरा, जितेंद्र महाले, यांनी सदर कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. या लाच प्रकरणी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बातमीपत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे

कारगिल विजय विशेष प्रवीण झोळेकरांनी कारगीलच्या जागवल्या आठवणी

१४ हजार फुट उंची, ५ डिग्री तापमानातही पोस्ट सांभाळून पाकिस्तानी अतिरेक्यांचा केला खात्मा सा.पोलीस व्हिजन […]

विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर. सोलापूर : दि.१९ (सा पोलीस व्हिजन, धुळे) विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – १३०/२०२४ अन्वये दिनांक १५/०३/२०२४ रोजी भा.द.वि कलम ३५४-अ,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va),३(१)(w)(ii) प्रमाणे यातील आरोपी रियाज पटेल याच्या विरुद्ध फिर्यादी गोविंद लांबतुरे यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. आरोपी रियाज पटेल याचा एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय असल्याने मागील ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्याच्या एअर कॉम्प्रेसर चे काम करण्यासाठी फिर्यादी हा आरोपी वर विश्वास ठेवुन जकराया शुगर येथील काम सोडून कुटुंबासहित सोलापुर येथे वास्तव्यास होता. त्यानंतर कामानिमित्त तो पुणे,कोल्हापूर,विजापूर व इत‌त्र ठिकाणी फिरून एअर कॉम्प्रेसर चे काम करत होता. २ ते ३ महिने आरोपीने त्यासोबत व्यवस्थित वागला व नंतर विनाकारण मानसिक छळ तसेच शिवीगाळी करू लागला. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गावी असल्याने आरोपीने याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीचे पत्नीचे विनयभंग केला होता व त्यांना “तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकतो” असे म्हणून धमकी दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत आरोपीस विचारले असता आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली तसेच दमदाटीही केली होती आणि “तू कोणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा,माझे कुणीही वाकडे करू शकत नाही असे बोलून अशोभनीय वर्तन केले होते. संशयित आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. संशयित आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी संशयित आरोपीला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात संशयित आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.सुरेश खोसे,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.ऐनिलेश कट्टीमनी,ॲड.सोहेल राम…. बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे ✍️

एस टी महामंडळ सामान्य प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे. धुळे … महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर रस्त्यावर धावणारी खेडेपाड्यामध्ये कानाकोपऱ्यात पोचणारी आपली हक्काची सामान्य जनतेच्या प्रवासाची एसटी बस ही डोळ्यासमोर उभी राहते. कोरोना काळामध्ये लाँक डाऊन झाला. आणि या एसटी बसची रस्त्यावर धावण्याची चाके थांबली. दोन वर्ष बसेस डेपो मध्ये अशाच पडून राहिल्या. आणि त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाल्यावर पुन्हा या लाल परीने रस्त्यावर येण्याचे धाडस केले. पण शासनाने त्यातच वेगवेगळ्या मोफत योजना देऊन प्रवासी आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी शक्कल लढवली. बुद्धांना मोफत प्रवास, दिव्यांगांना वन फोर, महिलांना 50 टक्के सवलत, शाळकरी मुलांना पास मध्ये सवलत, दररोज प्रवास करणाऱ्यांना सवलत, आणि याच सवलतीमुळे एसटी महामंडळाला जो पूर्ण मोबदला प्रवासाच्या तिकिटातून मिळत होता तो मिळणे कमी झाले. त्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स करणे कठीण झाले. जशा अवस्थेत तुटल्या फुटलेल्या छत गळक्या लाल परी रस्त्यावर धावतच राहिली त्यातून अनेक एसटी गाडी आपण रस्त्याने नादुरुस्त झाल्याचे पाहिले आहे. एसटीत प्रवास करताना तो पूर्ण होईल याची आता गॅरंटी कुणालाही नाही. कधी रस्त्यात बस पंक्चर झालेली, गिअर बॉक्स मुळे बंद पडलेली, रेडिएटर फुटल्यामुळे बंद पडलेली, कधीकधी मागील दोघेही चाकण निखळून शेतामध्ये जाऊन पडलेले अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपली लाडकी एसटी आता रोज रस्त्यावर दिसू लागली आहे. ती पूर्ण जीर्ण झालेली आहे. तरीदेखील महामंडळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्या बसेस तशाच पद्धतीने वापर करत आहेत. बस मध्ये प्रवाशांची ठरलेली संख्या असते परंतु ओव्हरलोड प्रवासी भरून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही एसटी रस्त्यावर धावत असताना मात्र आरटीओचे कोणतीही दंडात्मक कारवाई एस टी बस वर झाली असे आजपर्यंत ऐकण्यात आले नाही. शासनाचा हा भोंगळ कारभार थांबवला पाहिजे. एस टी महामंडळ मधील सर्व प्रवाशांना ज्या सवलती दिल्या गेले आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आणि पूर्ण तिकीट दराने प्रवास केल्यास जो पैसा महामंडळाला मिळेल त्यातून नवीन बसेस घेतल्या पाहिजेत किंवा ज्या 50% बसेस चांगल्या आहेत त्यांच्यावर सुधारणा करण्यासाठी खर्च केला पाहिजे सामान्य प्रवासी चा जीव फार महत्त्वाचा आहे एक प्रवाशाचा जीव जेव्हा जातो तेव्हा विमा कंपन्यांकडून पैसा दिला जातो पण तो पैसा देखील आपल्या सर्वसामान्यांचा असतो हा देखील विचार केला पाहिजे म्हणून महामंडळाने तातडीने शासनाकडे मोफत सवलती बंद करण्याबाबत आग्रह धरला पाहिजे आणि पूर्वीसारख्या ज्या एसटी महामंडळाने सेवा दिली आहे तशी सेवा चांगल्या पद्धतीने आज मिळाल्या तर एसटी महामंडळावरचा पूर्वीसारखा विश्वास सामान्य जनतेचा नक्कीच राहणार आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे