शेवाळी दा. ग्रामपंचायत सरपंच पदी महिला उमेदवार सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध निवड धुळे..सा पोलीस व्हिजन द्वारा… धुळे जिल्हा व साक्री तालुक्यातील नावलौकिक असलेले नागपूर सुरत महामार्गावरील शेवाळी दातर्ती या गावाच्या ग्रामपंचायतीस एक आदर्श इतिहास आहे. या गावात गुण्यागोविंदाने नागरिक विविध पक्षातील गट तट विसरून ग्रामपंचायतच्या बाबत एक चांगला आदर्श निर्माण करून ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची मंगळवारी सर्व सदस्य यांच्या निर्णयानुसार एकमताने बिनविरोध निवड करून पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे. या निवडीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील गावकऱ्यांनी केला आहे.शेवाळी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच पदी आता सुरेखा साळुंके या माझी साखरी पंचायत समितीचे सभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंखे यांच्या त्या काकू आहेत. नितीन साळुंके यांच्या प्रचंड राजकीय अनुभवातून त्यांना नक्कीच या ग्रामपंचायतीचा व ग्रामस्थांचा विकास कामाचा फायदा होणार आहे. शेवाळी दातरती ग्रामपंचायत मावळत्या सरपंच चित्राताई प्रदीप नांद्रे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या या राजीनाम्यामुळे सदर सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. त्यानुसार सरपंच पदाची फेर निवडणूक कार्यक्रम 26सप्टेंबर 2023 रोजी मंडळ निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष गजानन दगडू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत शेवाळी येथील प्रांगणात नवीन सरपंच पदाची निवडणूक पार पडली. सदर निवडणूक ही बिनविरोध एकमताने जाहीर झाल्याने एकच जल्लोष झाला. शेवाळी ग्रामपंचायतचे सरपंच पद ही महिला प्रवर्गातील राखीव असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहभाग घेण्यात येणार असल्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी तलाठींच्या वतीने सर्व 11 ग्रामपंचायत सदस्यांना लेखी नोटीसद्वारे कळविण्यात आले होते त्यानुसार शेवाळी ग्रामपंचायतचे सर्व 11 सदस्य हजर होते यावेळी सरपंच पदासाठी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने मंडळ अधिकारी शेवाळी तथा अध्यक्ष अधिकारी गजानन दगडू सोनवणे यांनी सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध एकमताने निवड जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायत शेवाळीचे ग्राम विकास अधिकारी श्री एम.जी सोनवणे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन, सचिव, सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्यकारी मंडळ सदस्य, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे प्राध्यापक शिक्षक शिक्षिका गावकरी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, जातीने उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच पदी निवड झाल्या नंतर नवनिर्वाचित महिला उमेदवार सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महिला सरपंच यांनी गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावचा विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरेखा साळुंके यांनी दिली आहे. शेवाळी गावातील वार्ड क्रमांक चार (खळवाडी) येथील शिवबाबा केंद्राच्या मागील दोन गल्ल्यांची रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत ते तातडीने व्हावेत यासाठी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांनी करून द्याव्यात अशी मागणी वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांनी केली आहे. या कामात लक्ष लवकरात लवकर घालावे आणि रस्त्यांचे कामे चांगल्या प्रकारे व्हावेत अशी आशा ग्रामस्थांनी सा पोलीस व्हिजन धुळे कडे व्यक्त केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक हे नक्कीच याकडे लक्ष घालतील असा विश्वास साप्ताहिक पोलीस व्हिजन ला आहे.

लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाईनिषेधार्ह आणि संतापजनक :एस.एम.देशमुख

माध्यमांचा आवाज बंद करण्याचा देशात सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो आहे.. लोकशाही न्यूज चॅनल पुढील 72 […]

ग्रामसेवक पुरस्कार साठी मलांजण येथील ग्रामसेविका श्रीमती रुपाली देवरे यांची सन 2017-2018 साठी शासनाने निवड केली आहेधुळे…. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागात ग्रामपंचायत म्हणजे विधिमंडळ असते. ग्राम सुधार व गावातील सर्व प्रशासकीय कामांमध्ये ग्रामपंचायत चे महत्वपूर्ण कार्य असते. साक्री तालुक्यातील मलांजन या गावातील ग्रामपंचायत सण 2017- 18 या वर्षासाठी उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रशासक ग्रामसेविका म्हणून श्रीमती रूपाली देवरे उर्फ सौ.रूपाली किरण सोनवणे (मराठे) यांची निवड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे आदर्श ग्रामसेवक दिला जातो.हा पुरस्कार दोन ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आठ वर्षातील पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद तर्फे ग्रामसेवकांना सन 2015 16 पासून पुरस्कार वाटप झाले नव्हते त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजी होती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी पुरस्कार वाटपासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यानुसार निवड समितीतर्फे सीओ शुभम गुप्ता यांनी पुरस्काराची घोषणा केली येत्या 2 ऑक्टोबरला सन 2015 ते 2023 या आठ वर्षातील 32 ग्रामसेवकांना पुरस्कार दिले जातील.सौ रुपाली किरण देवरे या मलांजण येथील श्री तानाजी गंगाराम सोनवणे (मराठे) व सौ मंदाकिनी तानाजी सोनवणे (मराठे ) यांच्या सुनबाई असुन सामाजिक कार्यकर्ते श्री किरण तानाजी मराठे यांच्या धर्मपत्नी आहेत.ग्रामसेविका रुपाली देवरे यांनी व सरपंच, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या ग्रामपंचायत मार्फत आपले मलांजन अतिशय आदर्श गाव असे सुधारणा करून शासनाचा पुरस्कार प्राप्त केला आहे आणि याच कार्यातून त्यांनी आपल्या ग्रामपंचायतचा हा पुरस्कार मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.नेहमी सहकार्य करणारे प्रेरणा स्थान श्रीमान ऋषिकेश मराठे व त्यांच्या धर्मपत्नी सरपंच यांचे सतत सहकार्य असते.सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी श्रीमती रुपाली देवरे ग्रामसेविका यांचे अभिनंदन केले आहे.सा.पोलीस व्हिजन तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

[9/8, 9:16 AM] policevision: शेवाळी दा चे लोककलावंत तात्यासाहेब अशोक साळुंके यांच्या लोकगीतास विशेष सन्मान पुरस्कार जिल्हा परिषद धुळे अध्यक्षांच्या हस्ते बहाल[9/8, 9:17 AM] policevision: शेवाळी… प्रल्हाद साळुंके,सा पोलीस व्हिजन धुळे… साक्री तालुक्यातील, शेवाळी दातर्ती हे गाव विविध कलागुणांनी नटलेल्या कलावंतांचे व शिक्षकांचे गाव आहे, या गावात शासकीय अधिकारी व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी देखील भरपूर प्रमाणात आहेत. या गावात शेतकरी देखील सदन व श्रीमंत आहेत. लोकशाहीर नाट्य कलावंत कैलासवासी विश्वासराव साळुंके यांचे हे गाव या गावात अजूनही पूर्वीपासून आदिवासी बांधव बाशी पोळ्याला लळीद हे रामायण नाट्य कथानक प्रत्यक्ष सोंग धारण करून संपूर्ण राज्यभर हा सामाजिक कार्य साजरा करत असतात. विविध नाट्य या गावात लेखन केले जातात व सादरही केले जातात अशी परंपरा आहे. या गावाला कैलासवासी आत्मारामबाबांसाहेब साळुंके यांच्या स्मरणार्थ सुंदर नाट्यगृह देखील उभारण्यात आले आहे. या गावात वारकरी संप्रदाय अतिशय गुण्यागोविंदाने संपूर्ण गावात भजन कीर्तन सोहळा साजरा करत असतो.सुख असो की दुःख असो, अध्यात्मिक कार्यक्रम असो तेव्हा हेच वारकरी संप्रदाय तेथे आपले मनमोहक भजन व कीर्तनाने सार्यांचे मन आपल्या कडे आकर्षित करून घेण्याची क्षमता यांच्याकडे आहे.या वारकरी संप्रदाय मधील खेळीमेळीच्या माध्यमातुन नाच करून देवाची आराधना करणारे लोककलावंत वारकरी म्हणजे अशोक तात्यासाहेब यांचे नाव लौकिक आहे.गायन कला तात्यासाहेब यांच्या कंठी असल्याने स्वरमालिका त्यांच्या गळ्यात आहेत त्यांच्या या कलेचा सन्मान होणे ही संपूर्ण शेवाळी ग्रामस्थांचा सन्मान झाला आहे.असे आपलेशेवाळी चे लोककलावंत तात्यासाहेब अशोक भगवान साळुंके यांचा जिल्हा परिषदेत, धुळे येथे विशेष सन्मान. शा मा प्रतिष्ठान तर्फे परवा राज्यस्तरीय लोकगीत गायन स्पर्धा संपन्न झाली. त्यात राज्यभरातील कलावंतांनी सहभाग नोंदविला. त्यात 3 मिनिटांच्या वेळेत सादर केलेल्या लोकगीतास उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त झाला. त्याद्वारे आज 4 वाजता धुळे जिल्हा परिषदेत जि प अध्यक्षा प्रतिनिधी मां.प्रा अरविंद जाधव सर यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान मानपत्र,मानचिन्ह, रोख 1500 रूपये देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष पारिजात चव्हाण, शाहीर श्रावण वाणी, सदस्य अनिल जगताप, आकाशवाणीच्या सहयोगी सदस्य पपिता जोशी, साधना शेषराव गोपाळ, जगदीशदादा देवपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.खानदेशात सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव उंच करणारे तात्यासाहेब अशोक भगवान पाटील यांचे सर्व शेवाळी गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.सा.पोलीस व्हिजन धुळे वतीने पुढील वाटचालीस अनंत शुभकामना.🌹🌹🙏

मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. “संविधान संरक्षण समितीचे” धुळे जिल्हा प्रशासनामार्फत गृहमंत्र्यांना निवेदन.

वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरदि.७ सप्टेंबर- जालना जिल्हा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांवर […]

जरांडे पाटलांच्या आंदोलनास धुळे जिल्हा मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा…!

धुळ्यात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात..!! धुळे- (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जालना जिल्ह्य़ातील […]

जय जिजाऊमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.त्याठिकाणी पोलिस प्रशासनाकडून आंदोलन करत्यांच्या गावातील लोकांना लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला याचा निषेध महाराष्ट्रभर चालु आहे.मनोज जरांगे यांची खेडेकर साहेबांनी भेट घेऊन सर्व गावकऱ्यांशी,जखमी गावकर्यांशी संवाद साधला व सर्व जिल्हाभर आंदोलकांनवर दाखल केलेले गून्हे विनाअट व विना शर्त मागेघ्यावे मराठा तरूणांच्या भविष्याची राखरांगोळी होवू नये यासाठी जालना जिल्हाधीकारी पांचाळ साहेब यांच्याशी कायदेशीर बाबीवर चर्चा केली.यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि मा.पुरूषोत्तम खेडेकर साहेब,माजी आमदार रेखाताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज भाऊ आखरे,प्रा.डाॅ.सुदर्शन तारख,संतोष गाजरेसह ईतरांची उपस्थिती होती.

पिंपळनेरच्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा….. कर्म. आ.मा. पाटील कला,वाणिज्य आणि कै. आण्णासाहेब एन.के.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरा करण्यात आली. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के.डी. कदम, सेवानिवृत्त प्रा.डॉ.डब्ल्यू. बी शिरसाठ प्रा.एल. जे.गवळी प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे उपस्थित होते.प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा.एल.जे.गवळी म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन बहुआयामी शिक्षक होते जीवनात मानवी वर्तन कसे असावे.म्हणून त्यांच्या जीवनाकडे विद्यार्थ्यांनी बघावे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य के. डी.कदम म्हणाले प्रत्येक व्यक्ती लहान,मोठी गुरु असते कारण प्रत्येकाकडून शिकण्यासारखे असते चांगले ते आत्मसात करून आचरणात आणले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे यांनी केले.चेतना निकुंभ, राऊत सलोनी,पवार सागर,घाणेकर इंद्रायणी, या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.के.एन.वसावे यांनी मानले याप्रसंगी प्रा.के.आर. राऊत, डॉ. एस. पी. खोडके,प्रा.एम. व्ही.बळसाने प्रा. व्ही.जी.उगलमुगले प्रा.डॉ. वाय. एम. नांद्रे, डॉ.एस.एस.मस्के प्रा. डी.बी. जाधव प्रा. सी. एन. घरटे.प्रा. डॉ. ए.जी.खरात डॉ. एन.बी.सोनवणे प्रा. सूर्यवंशी, प्रा.वानखेडे,प्रा.वाघ, प्रा.देसले, प्रा.सोनवणे, प्रा. डॉ. प्रशांत बागुल, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते

शिक्षक दिन हा भारताचा गौरवदिन व्हावा

(राष्ट्र उभारणीसाठी शासन,शिक्षक,पालक, विद्यार्थी व प्रसारमाध्यम यांची भुमिका) शासन आणि शिक्षणज्या देशाची शिक्षणव्यवस्था मजबूत असेल […]