अमळनेर..(जळगाव जिल्हा)…. साप्ताहिक पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो … दंगल सारखी परिस्थिती का उद्भवली? दंगल नेमकी का घडवली जाते?? असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना जेव्हा पडतो तेव्हा एकच उत्तर येते ते म्हणजे राजकीय स्टंट. मात्र अमळनेर येथील दंगल जी उसळली ती केवळ मुलांच्या भांडणातून दोन गट एकमेकांना भिडले आणि दंगल निर्माण झाली. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली. यानंतर बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला असून, तलवार हल्ल्यात एक पोलीस अधिकारी तसेच दगडफेकीतील तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 29 जणांना अटक केली आहे शहरात तीन दिवसांसाठी 144 कलम प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील वातावरण भयभीत झाले आहे. जीनगर गल्ली सराफ बाजार, पान खिडकी, खड्डाजीन, जुना पारधी वाडा, भागात तणावपूर्ण शांतता आहे . दोन ते तीन लहान मुलांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून चक्क दोन गटात दगडफेक झाली 9 जून रोजी रात्री साडेदहाला जिंजर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डीवायएसपी सुनील नंदवाळकर चोपडा डी वाय एस पी ऋषिकेश रावळे यांनी रात्री भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी आरोपींची धडपकड करीत 29 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 61 जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण मिळवले मात्र अजूनही तणाव कायम आहे दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कैलास कडलग, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत 10 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 12 जूनच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे त्यामुळे सर्व अंमळनेर शहरातील व्यवहार ठप्प पडले असून. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने अंमळनेर शहरांमध्ये संचारबंदी लागू केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे. आज लग्न तिथी मोठी असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वराडाला मात्र संचार बंदीमुळे भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने लग्न समारंभासाठी येणाऱ्या सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सहकार्य करण्याची भावना लग्न ज्यांच्या घरी आहे अशा कुटुंबाच्या व्यक्तींनी मागणी होत आहे असे बोलले जात आहे. लग्न वारंवार होत नाहीत. लग्नाचे नियोजन एक ते दोन महिने आधीच झालेले असतात. त्यामुळे संचारबंदी जरी लागू असेल तरी त्या ठिकाणी असे अपवाद वगळता पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा वर्हाडीमंडळींकडुन वर्तवली जात आहे. बातमी पत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे
Related Posts
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक!! धनगर समाजाने ही दिला पाठींबा जरांगे पाटील म्हणाले मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणाले दोन दिवसात देतो आरक्षण??मराठा पाठोपाठ धनगर समाजही आक्रमक सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याची सुरुवात?✍️✍️✍सा पोलीस व्हिजन न्युज मिडिया……… सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षण मुद्दा ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असुन त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर गावोगावी मराठा समाज आरक्षण मिळत नाही म्हणून आक्रमक होऊन सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे तसे बॅनर गावागावात दिसू लागलेत राजकीय पक्षाचे नेते गावात आले तर त्यांना खडे बोल सुनवतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गावात प्रवेश मिळणार नाही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज ही आक्रमक होत आहे धनगर समाजानेही सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत आहेत. तसेच बॅनर बाजी धनगर समाजही करु लागला आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून तर धनगर समाजाने पश्चिम महाराष्ट्रात गाव बंदीची घोषणा करुन सुरुवात केली आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावण भूमीतून मराठा आणि धनगरांचे दुखणे एकच आहे. धनगर समाजाला घटनेतच आरक्षण मिळाले आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी धनगड आणि धनगर अशी दुरुस्ती करुन र चा ड असा फरक झाल्यामुळे ७० वर्षे झाले तरी न्याय मिळत नाही. हेच दुर्दैव आहे राज्यकर्ते शासन निर्णय घेणार नसेल तर राज्यात मराठा समाज एक नंबर आहे तर धनगर समाजही दोन नंबर वरती आहे मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला तर आरक्षण मिळेल परंतु आरक्षण मागणारे नाही तर देणारे होतील त्यामुळे सरकारने जास्त वेळ न घेता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण लागू करावे…..
- Pralhad Salunkhe
- October 30, 2023
- 0
नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
- Pralhad Salunkhe
- December 13, 2024
- 0
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश मुंबई (क्राईम […]
शाकुंतल सदग्रंथ वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार
- Pralhad Salunkhe
- August 26, 2024
- 0
शाकुंतल सदग्रंथ वाचनालय खर्दे बु ता. शिंदखेडा या वाचनालयाव्दारे दि. १४/८/२०२४ रोजी संध्याकाळी खर्दे बु. […]