अमळनेर..(जळगाव जिल्हा)…. साप्ताहिक पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो … दंगल सारखी परिस्थिती का उद्भवली? दंगल नेमकी का घडवली जाते?? असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना जेव्हा पडतो तेव्हा एकच उत्तर येते ते म्हणजे राजकीय स्टंट. मात्र अमळनेर येथील दंगल जी उसळली ती केवळ मुलांच्या भांडणातून दोन गट एकमेकांना भिडले आणि दंगल निर्माण झाली. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली. यानंतर बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला असून, तलवार हल्ल्यात एक पोलीस अधिकारी तसेच दगडफेकीतील तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 29 जणांना अटक केली आहे शहरात तीन दिवसांसाठी 144 कलम प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील वातावरण भयभीत झाले आहे. जीनगर गल्ली सराफ बाजार, पान खिडकी, खड्डाजीन, जुना पारधी वाडा, भागात तणावपूर्ण शांतता आहे . दोन ते तीन लहान मुलांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून चक्क दोन गटात दगडफेक झाली 9 जून रोजी रात्री साडेदहाला जिंजर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डीवायएसपी सुनील नंदवाळकर चोपडा डी वाय एस पी ऋषिकेश रावळे यांनी रात्री भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी आरोपींची धडपकड करीत 29 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 61 जणांवर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण मिळवले मात्र अजूनही तणाव कायम आहे दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कैलास कडलग, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत 10 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 12 जूनच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे त्यामुळे सर्व अंमळनेर शहरातील व्यवहार ठप्प पडले असून. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने अंमळनेर शहरांमध्ये संचारबंदी लागू केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे. आज लग्न तिथी मोठी असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वराडाला मात्र संचार बंदीमुळे भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने लग्न समारंभासाठी येणाऱ्या सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सहकार्य करण्याची भावना लग्न ज्यांच्या घरी आहे अशा कुटुंबाच्या व्यक्तींनी मागणी होत आहे असे बोलले जात आहे. लग्न वारंवार होत नाहीत. लग्नाचे नियोजन एक ते दोन महिने आधीच झालेले असतात. त्यामुळे संचारबंदी जरी लागू असेल तरी त्या ठिकाणी असे अपवाद वगळता पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा वर्हाडीमंडळींकडुन वर्तवली जात आहे. बातमी पत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे
Related Posts
पुणे गँगरेप : पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. पुणे…. (सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न पुणेकरांना व सामान्य जनतेला पडला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे राज्य म्हटले जाते. या राज्यात पूर्वी महिला खूप सुरक्षित होत्या. महिलांचा आदर केला जात होता. मात्र वारंवार घडत असलेल्या पुणे शहरातील बलात्काराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करण्याची गरज आहे.पुण्यात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने सरकार आणि प्रशासन हादरले आहे. तास उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली असून, हे संशयित कुठेही दिसल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 14 पथके तयार केली आहेत.21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर हादरलेल्या पुणे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी डझनहून अधिक पथके तयार केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता मित्रासोबत डोंगरमाथ्यावर गेली होती. तेवढ्यात ३ जण तिथे आले. आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. यानंतर दोघांनाही डोंगरमाथ्यावरून खाली उतरवून डोंगराच्या खालच्या भागात नेण्यात आले. त्याला टेकडीवरून खाली उतरवल्यानंतर आरोपीने मुलाला त्याच्याच शर्टने आणि बेल्टने बांधले. हातपाय बांधण्यासोबतच त्याला आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापडही बांधले होते.
- Pralhad Salunkhe
- October 5, 2024
- 0
पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलाला नियंत्रित केल्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. टेकडीवर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे […]
धुळे एल सी बी ची मोठी कामगिरी लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात मिळाले साठ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे :
- Pralhad Salunkhe
- April 2, 2024
- 0
धुळे..(दोंडाईचा)…सा पोलीस व्हिजन क्राइम न्युज ब्युरो…. शासकीय वर्दी असली की काहींना त्या वर्दीचा माज चाललेला […]
सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रश्न संच वाटप गट साधन केंद्र सुंदरदे ता जि नंदुरबार येथील केंद्रातील शाळांना शासनाच्या संकलित चाचणी परीक्षा प्रश्नसंच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रत्यक्ष प्रश्न संच वाटप सुंदरदे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख बापुसाहेब देसले सो.यांनी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास आर सुर्यवंशी सर,श्राफ संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक बापूसाहेब मिलींद माळी,सोबत सह शिक्षक श्री धनगर सर यांना प्रश्न संच वाटप करताना दिसत आहेत.शुक्रवार दिनांक.27-10-2023 रोजी सुंदरदे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद नंदुरबार शालेय शिक्षण विभाग व्दारा शिक्षकांसाठी शिक्षक परीषद चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळा या शिक्षक परीषद साठी उपस्थित होते.शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती साधन उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी उपस्थित शिक्षकांना दुपारच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट केली होती.सदर संकलित चाचणी परीक्षा सोमवार दिनांक..30-10-2023 ते 1-11-2023 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती 100% ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे.भाषा, गणित, इंग्रजी या मुख्य तीन विषयांच्या या परीक्षा होणार सोबतच नियमित प्रथम सत्र परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी द्यायचीच आहे असे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी या वेळी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️सा पोलीस व्हिजन धुळे
- Pralhad Salunkhe
- October 28, 2023
- 0